Fri, Apr 17, 2026
प्रशासन

व्याहळी कॉलनी गावातील महेश थोरवे यांचे एमपीएससी परीक्षेत नेत्रदीपक यश.

व्याहळी कॉलनी गावातील महेश थोरवे यांचे एमपीएससी परीक्षेत नेत्रदीपक यश.
Ashok Ithape
  • PublishedApril 11, 2024

वाई l प्रतिनिधी:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC), महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा-२०२१ या परीक्षे अंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या परीक्षेचा निकाल बुधवार दिनांक 10 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षा आणि मुलाखत यानंतर अंतिम उमेदवारांच्या नावाची यादी आणि पात्रता गुण (कटऑफ ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केले.

या परीक्षेत व्याहळी कॉलनी गावातील श्री. महेश शामराव थोरवे यांनी उज्वल यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पद मिळवले . महेश यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वाई मध्ये पूर्ण केले तर उच्च माध्यमिक शिक्षण वाय सी कॉलेज सातारा येथे व पदवि बी. इ इन्स्ट्रुमेशन इंजीनियरिंग मुंबई येथे केले .

लहानपणापासूनच अधिकारी व्हायचं आहे , हे मनाशी ठाम बांधून पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यासास प्रारंभ केला. कोणताही खाजगी क्लास न लावता आपली नोकरी सांभाळत मिळेल त्या वेळेस ग्रंथालयामध्ये अभ्यास करून हे उत्तुंग यश मिळवले. त्यांना अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये संधी काही गुणांसाठी हुकवत होती मात्र निराश न होता त्याचे प्रयत्न सातत्याने चालू होते.बुधवारी 10 एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला व थोरवे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली.

महेश अकरावीला असताना पितृछत्र हरपले. मात्र या अडचणीच्या काळात त्यांच्या आई प्राथमिक शिक्षिका व जिल्हा परिषद शाळा एकसर शाळेच्या मुख्याध्यापिका प्रभावती शामराव थोरवे व त्यांचे संपूर्ण कुटुंब भक्कमपणे त्याच्या पाठीशी उभे राहिले. अपयश आले तरी न डगमगता जिद्द, चिकाटी, मेहनत, सातत्य व प्रामाणिकपणा याच्या जोरावर महेश यांनी यश संपादन केले. त्यांचे वडील स्वर्गीय शामराव रंगराव थोरवे यांची इच्छा होती की आपल्या मुलाने अधिकारी व्हावे ती इच्छा आज पूर्णत्वास आली.

त्यांच्या यशाची बातमी समजताच व्याहळी कॉलनी ग्रामस्थ, त्यांचे कुटुंब व नातेवाईक यांनी आनंद उत्सव साजरा केला.या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!