वाई पंचायत समितीच्या भरारी पथकाकडून प्लास्टिक वापर करणाऱ्या व कचरा उघड्यावर फेकणाऱ्या व्यक्तींवर धडक कारवाई
जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा कार्यक्षेत्रामध्ये नागरिकांकडून प्लास्टिक वापर सर्रास केला जात असल्याने जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य टिकवण्यासाठी गाव व तालुका स्तरावरील पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिल्या होत्या या पार्श्वभूमिवार आज वाई पंचायत समिती मार्फत धड़क करवाई सुरु करण्यात अली आहे.
वाई l प्रतिनिधी :
ग्रामपंचायत विरमाडे ता.वाई येथे आनेवाडी टोल नाका राष्ट्रीय महामार्ग जवळील व्यावसायिक व दुकानदार यांच्यावर पाणी व स्वच्छता विभाग पंचायत समिती वाई अंतर्गत 12 व्यावसायिक व दुकानदार यांनी सार्वजनिक रस्त्याच्या कडेला व उघड्यावर प्लास्टिक व घनकचरा कचरा टाकल्याबद्दल कारवाई करण्यात आली.

पंचायत समितीचे सहा. गटविकास अधिकारी कुचेवार, विस्तार अधिकारी (पंचायत ) रुपेश मोरे व राहुल हजारे यांच्या मार्गदर्शना खाली स्थापन केलेल्या तालुका स्तरीय पथका मार्फत संबंधित व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे तालुका सल्लगार रोहित जाधव, घनकचरा व्यवस्थापन अभियंता अक्षय शिंदे, स्वाती कचरे सरपंच ग्रामपंचायत विरमाडे, उपसरपंच जयवंत सोनावणे, तुषार सोनावणे व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक रघुनाथ भोईर, आणि पथक सदस्य उपस्थित होते.
भरारी पथका मार्फत उघड्यावर कचरा टाकणाऱ्या दुकानदार यांना नोटीस देण्यात आले. यापुठे प्रशासना मार्फत कडक कारवाही करण्यात येणार असलेबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी सर्व व्यवसायिक व दुकानदार यांनी सकारात्मक भूमिका घेत सार्वजनिक स्वच्छतेकरिता कटिबद्ध राहून स्वच्छतेचे सर्व नियमांचे पालन करण्यात येईल असा प्रतिसाद दिला.

जिल्ह्याचे स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी गावांमध्ये उघड्यावरती कचरा फेकणाऱ्या लोकांची नावे पोलीस स्टेशनला कळवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत व त्या व्यक्तींच्याकडून दंड वसूल करणे यावा पुढील एक महिन्याच्या कालावधीमध्ये ही मोहीम अधिक कडक करण्यात यावी.
सातारा जिल्ह्यातून कचरा ही समस्या कायमस्वरूपी घालवण्यासाठी गावपातळीवर जनजागृतीचे उपक्रम करून लोकांची मानसिकता बदलण्याचे काम पथकांनी करावे अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.













