Thu, Jan 15, 2026
Media

सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची मोठी परंपरा पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची मोठी परंपरा पालकमंत्री शंभूराज देसाई
Ashok Ithape
  • PublishedJanuary 6, 2026

सातारा दि.6 : सातारा जिल्ह्याला निर्भीड पत्रकारितेची फार मोठी परंपरा आहे. चांगल्या गोष्टींसाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन यांना भक्कम पाठींबा देण्णारी आहे. यापूढेही माध्यमांच्या प्रतिनिधींनी लोकहिताची कामे करताना सहकार्य करावे. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि माध्यमे यांनी साताऱ्याच्या उज्वल विकासासाठी हातात हात घालून एकत्र काम करुया, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाच्यावतीने पत्रकारांसाठी, सर्व माध्यमांतील प्रतिनिधींसाठी चहापान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी खासदार नितीन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह संपादक, वरिष्ठ पत्रकार, इलेक्ट्रानिक मिडीयाचे प्रतिनिधी, समाज माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साताऱ्याला निर्भिड पत्रकारीतेचा वारसा असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या आधीच्या पिढीतील अनेक दिग्गज पत्रकारांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पत्रकारीता केली. लोकहितकारी उपक्रमांना भरु भरुन पाठींबा देत असतानाच जिथे चुका व त्रूटी आढळलेल्या त्यावर कठोरपणे प्रहार करुन डोळ्यात अंजन घालण्याचे कामही त्यांनी केले. समाजातील अनिष्ठ प्रथा, समस्या यावर प्रकाश टाकून लोकांना जागरुक करण्याचे काम पत्रकारितेने केल्याचे सांगून पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कटीबध्द राहू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. नुकतेच झालेले 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संयोजक, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, प्रशासकीय यंत्रणा यांचे त्यांनी मन:पूर्वक अभिनंदन केले.

खासदार नितीन पाटील यांनी यावेळी पत्रकार, माध्यम प्रतिनिधींना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील म्हणाले, जे चांगले त्याला प्रसिध्दी देण्याचे आणि जिथे त्रूटी आढळल्या त्या निर्दशनास आणून देण्याचे कार्य साताऱ्यातील वृत्तपत्रे व मिडीया अव्याहतपणे करत आले आहेत. साताऱ्यातील वृत्तपत्रांनी आणि माध्यमांनी सकारात्मक पत्रकारितेचे व लोकहितासाठी अखंडपणे लढण्याचे व्रत कायमपणे जोपासले आहे. सरकार आणि जनता यांच्यामधील दुवा जपत असतानाच जनतेला माहिती देणे आणि को

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!