भुईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे NMMS परीक्षेत घवघवीत यश.
भुईंज l प्रतिनिधी:
भुईंज ता.वाई येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर काँलेज येथील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासना मार्फत जी परिक्षा घेतली जाते त्यामध्ये 100 विद्यार्थी-विद्यार्थीनी NMMS परीक्षे साठी बसले होते त्याचा निकाल हा विद्यालयासह रयत शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढवनारा लागलेला असुन एकुन संत्तर विद्यार्थ्यांच्या पैकी एकोनसाठ विद्यार्थ्यांना शिष्यवृती मिळण्याची शक्यता आहे.
यासर्व विद्यार्थी-विद्यार्थींनीना विभाग प्रमुख सौ.चित्रा भोज, मनिषा आगलावे मॅडम, संगिता गायकवाड मॅडम, मारुती साळुंखे सर, यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
या सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थीनिंचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाँडी सदस्य मा.भैय्यासाहेब जाधवराव-इनामदार, विभागीय अधिकारी साळुंखे, मुख्याध्यापिका सौ.निलम चव्हाण मॅडम, पर्यवेक्षिका सौ.भारती साळुंखे, गुरुकुल प्रमुख महेश भोईटे, उप गुरुकुल प्रमुख हर्षदा इताले मॅडम यांनी अभिनंदन केले.













