Thu, Jan 15, 2026
प्रशासन

सातारा जिल्हा परिषदेचा महत्त्वाचा निर्णय – विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा दोन दिवस बंद

सातारा जिल्हा परिषदेचा महत्त्वाचा निर्णय – विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा दोन दिवस बंद
Ashok Ithape
  • PublishedAugust 19, 2025

सातारा, दि. 19 ऑगस्ट 2025 हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळा बुधवार दिनांक 20 ऑगस्ट 2025 व गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी बंद राहतील, असा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.

हा निर्णय पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई, सातारा व कराड या तालुक्यांतील शाळांसाठी लागू असून कोरोची, खटाव, खंडाळा, माण व फलटण या तालुक्यांमध्ये देखील स्थानिक परिस्थितीनुसार शाळा बंद ठेवण्याचे अधिकार संबंधित तालुका प्रशासनाला दिले आहेत.

जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी कळविले आहे की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या सुट्टीमुळे झालेला शैक्षणिक तासांचा तोटा भरून काढण्यासाठी शाळांनी पुढील रविवारी अध्यापन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रशासनाने पालकांना आवाहन केले आहे की, या पावसाळी परिस्थितीत विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी व अनावश्यक बाहेर जाणे टाळावे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!