Thu, Apr 2, 2026
सातारा जिल्हा

सातारा जिल्हा परिषद अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता; विभागनिहाय तरतुदी जाहीर

सातारा जिल्हा परिषद अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता; विभागनिहाय तरतुदी जाहीर
Ashok Ithape
  • PublishedMarch 20, 2026

सातारा, दि. 18 : महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती (अर्थसंकल्पीय अंदाज) नियम, 1966 मधील नियम क्र. 137 नुसार अंदाजपत्रक मंजुरीची मुदत निश्चित असली तरी, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड दि. 20 मार्च 2026 रोजी होत असल्याने सर्वसाधारण सभेसाठी आवश्यक कालावधी उपलब्ध न झाल्याने सन 2026-27 च्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

सन 2026-27 साठी अपेक्षित महसुली उत्पन्न 4541.00 लक्ष व भांडवली उत्पन्न 1892.00 लक्ष रुपये गृहीत धरून महसुली खर्च 4540.00 लक्ष व भांडवली खर्च 1892.00 लक्ष रुपये असा संतुलित अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. सन 2025-26 चे अंतिम सुधारित अंदाजपत्रक महसुली 11312.67 लक्ष व भांडवली 2092.00 लक्ष रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे.

विभागनिहाय तरतूद (रु. लाखात)
मानधन : 80.00
सामान्य प्रशासन : 150.00
शिक्षण विभाग : 180.00
शिक्षण (५% देखभाल व दुरुस्ती) : 81.00
बांधकाम विभाग : 800.00
लघुपाटबंधारे विभाग : 40.00
आयुर्वेद : 20.00
आरोग्य विभाग : 140.00
सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी : 50.00
कृषि विभाग : 110.00
पशुसंवर्धन विभाग : 54.00 (विविध योजनांसाठी)
वने विभाग : 2.00
समाजकल्याण विभाग : 298.86 पेक्षा अधिक तरतूद
महिला व बालकल्याण विभाग : 145.00 पेक्षा अधिक तरतूद
इतर (ग्रामपंचायत/आपत्कालीन/अनुदाने) : 1488.49

प्रमुख तरतुदी – बांधकाम विभागांतर्गत पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने, सुरक्षा व्यवस्था, विश्रामगृह दुरुस्ती तसेच ग्रामीण रस्ते व इमारत कामांसाठी निधी देण्यात आला आहे.
आरोग्य विभागात औषध पुरवठा, प्राथमिक आरोग्य केंद्रे व पालखी सोहळ्यासाठी निधी राखीव आहे.

कृषि विभागातून शेतकऱ्यांना साहित्य, यांत्रिकीकरण व सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन दिले जाणार आहे.

समाजकल्याण व महिला-बालकल्याण विभागांतर्गत मागासवर्गीय, दिव्यांग, महिला व विद्यार्थ्यांसाठी विविध योजनांना प्राधान्य देण्यात आले आहे.

हे अंदाजपत्रक नव्याने स्थापन होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेपुढे अवलोकनार्थ सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!