Thu, Jan 15, 2026
सहकार

‘किसन वीर’ तर्फे वाहनांना रिफ्लेक्टरचे वाटप

‘किसन वीर’ तर्फे वाहनांना रिफ्लेक्टरचे वाटप
Ashok Ithape
  • PublishedNovember 15, 2025

स्वसुरक्षेसाठी वाहन मालकांनी दक्षता घ्यावी ; प्रमोद शिंदे

दि. १५  : किसन वीर साखर कारखान्याचा गळित हंगाम सुरू झाल्यानंतर ऊस तोड वाहनांच्या वर्दळीमुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. संभाव्य अपघात टाळण्यासाठी व स्वसुरक्षेतेसाठी वाहन मालकांनी दक्षता घेऊन आपल्या वाहनांना रिफ्लेक्टर बसवून संभाव्य अपघात टाळावेत, असे आवाहन किसन कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिदे यांनी केले.

किसन वीर साखर कारखान्याकडे ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रक, मुंगळा गाडी, बैलगाड्यांना भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहाय्यक पोलीस फौजदार वैभव टकले, सहाय्यक वाहतुक हवालदार सुशांत धुमाळ, संचालक बाबासाहेब कदम, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, हणमंत चवरे, प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे ,कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांच्या हस्ते रिफ्लेक्टर बसविण्यात आले

यावेळी शेती अधिकारी विठ्ठलराव कदम, अमृत गोळे, वाहन मालक, शेतकरी, शेती व सुरक्षा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!