Mon, Mar 2, 2026
क्रीडा

भुईंज येथील “वालेकर स्पोर्ट्स फाउंडेशन” आयोजित स्वराज्य क्रिकेट लीग २०२४ च्या माध्यमातून पहिले मराठी पाऊल पुणे नगरीत पडले.

भुईंज येथील “वालेकर स्पोर्ट्स फाउंडेशन” आयोजित स्वराज्य क्रिकेट लीग २०२४ च्या माध्यमातून पहिले मराठी पाऊल पुणे नगरीत पडले.
Ashok Ithape
  • PublishedFebruary 1, 2024

भुईंज। महेंद्रआबा जाधव

राजमाता जिजाऊ ,छत्रपती शिवराय आणि जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत स्वराज्य क्रिकेट लीग चा भव्य उद्घाटन सोहळा छत्रपती शिवरायांच्या शिवविचारावर स्वराज्यासाठी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणाऱ्या स्वराज्याच्या शिलेदारांच्या वारसदारांच्या साक्षीने शिव संपन्न झाला.
सेवेशी तत्पर हिरोजी इंदलकर, महायोद्धा बाजीप्रभू देशपांडे, गुप्तहेर खाते बहिर्जी नाईक, स्वामिनिष्ठ कानोजी जेधे, सर सेनापती हंबीरराव मोहिते, सरसेनापती प्रतापराव गुजर पिलाजी राजे शिर्के,यांच्या स्वराज्य विचारांचे वारसदार वंशज यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य क्रिकेट लीगचे पहिले मराठा पाऊल,पुणे नगरीत पडले.

माँसाहेब जिजाऊ आणि बाल शिवबा यांनी सोन्याचा नांगर फिरवला त्या पुण्यनगरीत राजधानी सातारा जिल्ह्यातील भुईंज ता.वाई येथील शुभम वालेकर याच्या कर्तृत्वाचे पहिले पाऊल तोही स्वराज्यासाठी रक्ताचा अभिषेक करणाऱ्या वंशाच्या साक्षीने पडले भुईंज सारख्या ग्रामीण भागातील मुलगा क्रीडा क्षेत्रातील नावाजलेल्या क्रिकेट लीग स्पर्धे सारखा वेगळा विचार घेऊन प्रयत्न करताना पाहून सर्वांना आनंद झाला. आपल्या विचाराने, सच्चेपणामुळे,आदर्श कृतीमुळे शुभम कौतुकास पात्र ठरला. दिखाऊपणापेक्षा विचाराचा देखावा कधीही मोठा असतो. वडील रामदास आई सौ. अशा वालेकर चुलते श्रीकांत व सौ. उषा वालेकर यांच्या चेहऱ्यावरील आनंद वेगळाच होता. त्यांनी दिलेली संस्कार आणि विचारांची शिदोरी घेऊन वाटचाल करून तौ आपले व आपल्या कुटुंबाचे व समाजाचे
भुईंज गावाचे नाव असेच उंचावेल हीच अपेक्षा. भुईंज ग्रामस्थ व डिसेंट स्विईंग मशीन कंपनी तर्फे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.

दिनांक 31 जानेवारी 2024 ते 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत क्रिकेटचे 19 सामने होणार आहेत.याचे लाईव्ह प्रक्षेपण युट्युब वरून स्वराज्य क्रिकेट लीग पाहता येईल.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!